गुरुवार, ३० जून, २०१६

पाऊस आणि मी..

सतिश शामराव रावण..


जय गुरुदेव, सद्गुरुंच्या चरणी नमन 🙏🏻🌹


गुरुवार दि. ३० जून २०१६

या वर्षी मान्सूनला वेळेत सुरूवात झाल्यामुळे २ - ४ दिवस पावसाच्या संततधारा कायम सुरू होत्या.

गुरुवारचा दिवस असल्यामुळे मला कुर्ल्याला जायचं होतं.. त्या दिवशी दिवसभर पाऊस थोडा मंदावला होता. पण रिपरिप पाऊस चालूच होता. माझा बाईक घेऊन कुर्ल्याला जाण्याचा बेत होता.. म्हणून दुपारी साडेचारच्या सुमारास पाऊस पूर्ण थांबला असताना मी निघालो.. घरातून निघताच मनातच भगवंतांना प्रार्थना केली की, "वरुण देवा आता अर्धा तास कृपा करा." असं म्हणून मी नामस्मरण करत कुर्ल्याच्या दिशेने निघालो.

संध्याकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी होतीच.. २५ - ३० मिनिटांचं अंतर सर करण्यासाठी पाऊण तास लागत होता. कलीना युनिव्हर्सिटी जवळ येताच अचानक पावसाच्या धारा बरसू लागल्या. मी पटकन बाईक रस्त्याच्या कडेला घेतली आणि एका दुकानाच्या शेड खाली उभा राहीलो.. कुतूहल म्हणून घड्याळात पाहीले तर, बरोबर ५ वाजून ३ मिनीटं झाली होती. ते पाहून माझ्या चेहऱ्यावर स्मित झळकले आणि मनात एक विचार येऊन गेला.. "भगवंतांनी आपल्या प्रार्थनेचा शब्दशः अर्थ घेतला वाटतं, आणि बरोबर अर्ध्या तासांनी पाऊस सुरू झाला.."

काही मिनिटात तो पाऊस सुद्धा थांबला आणि सव्वापाचच्या सुमारास मी कुर्ल्याला घरी पोहचलो...

याबद्दल बाबांना सांगितल्यावर बाबा हसले आणि म्हणाले, "मनापासून भगवंतांना हाक मारली की आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहचतो ."



या अनुभवावरुब असं जाणवलं की, हे संपूर्ण विश्व ज्या भगवंतांच्या पोटात सामावलं आहे त्याच विश्वव्यापी भगवंताच्या लेखी आपली छोटीशी का असेना, पण नोंद आहे.




...अपूर्ण


#SrSatish🎭

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा