मंगळवार, ३० मार्च, २०२१

बाबांची फुलं..

शुक्रवार दि. २६ मार्च २०२१
नंदा शामराव रावण

जय गुरुदेव, सद्गुरुंच्या चरणी नमन 🙏🏻🌹


मी आज दुपारी सहज आडवी पडले असताना थोडासा डोळा लागला, तेव्हा मला एक स्वप्न - दृष्टांत झाला..

स्वप्नमध्ये मी नेमकं कुर्ल्यात होते की, आणखीन कुठे ते कळलं नाही.. सुरुवातीला तिथे आई दिसल्या. बाबा कुठे दिसत नव्हते.. आपले बरेच साधक मंडळी तिथे दिसत होते, पण चेहरा कोणाचा नीट दिसत नव्हता. फक्त सतिशचे बाबा तिथे दिसत होते. गोदा आत्ती सुद्धा दिसत होत्या.

तीर्थाचा कार्यक्रम चालू होता. तेंव्हा मी आतल्या खोलीतून बाहेर आले, आणि मी येताच आई तिथेच बाजूला असलेल्या त्यांच्या बिछ्यान्यावर पांघरून घेऊन झोपल्या. आईंच्या जवळच गोदा आत्ती बसल्या होत्या.

आई झोपताच मी त्यांना मिठी मारली, आणि विचारलं, ... "मी आल्या - आल्या तुम्ही का झोपलात?"

तेंव्हा आईंनी सुद्धा मला मिठी मारली आणि रडू लागल्या.. मी आईंना म्हणाले की, "पौर्णिमेला पोळ्या आणायच्या आहेत.." ... तेंव्हा आई जागेवर उठून बसल्या आणि माझ्या कानात काहीतरी सांगू लागल्या.. नेमकं काय सांगत होत्या ते मात्र काही कळलं नाही.. त्या वेळी तिथे बाबा दिसले, तेंव्हा बाबा आईला म्हणाले की, "मला फुलं दे! नंदाला द्यायची आहेत!"

बाबांचं बोलणं मला नेमकं काही कळेना.. आई पण म्हणाल्या की, "नंदाला आता फुलांची गरज नाही, तिला तीर्थ द्या..."

तेंव्हा बाबा म्हणाले, "मला तिला फुलचं द्यायची आहेत..!"

फुलांवरून आई आणि बाबांचं नजरेनेच काहीतरी बोलणं चालू होतं.. मग मी सुद्धा आईंना म्हणाले, "आई मला फुलं नको.." ... असं दोन वेळा म्हणाले..  आणि नंतर.. "माझ्या ऐवजी सतिशला द्या ही फुलं.." असं मी आईंना सांगितलं..

"सतिशला द्यायचं ते मी बरोबर द्यायला सांगणार, तू आता ही फुलं घे..! बाबांचा शब्द राख.. आणि पुन्हा बाबांच्या चरणांवर ठेव.." ... असं म्हणून आईंनी बाबांकडे फुलं दिली ..

तेंव्हा आईंनी सांगितल्याप्रमाणे बाबांनी माझ्या हातात पांढरी शुभ्र फुलं ठेवली.. आणि मी बाबांना नमस्कार करून पुन्हा ती फुलं त्यांच्या चरणांवर अर्पण केली. 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹


जय गुरुदेव 🙏🏻🌹🙏🏻🌹

शुक्रवार, १९ जून, २०२०

शांतीब्रह्म - एक अनुभव

सतिश शामराव रावण

जय गुरुदेव, सद्गुरुंच्या चरणी नमन 🙏🏻🌹

१६ एप्रिल २०२०

तो सुद्धा गुरुवारचाच दिवस होता.. संध्याकाळी ५ ची वेळ.. संपूर्ण जग कोरोनामूळे lock-down असल्यामुळे आहे तो वेळ सार्थकी लावावा म्हणून नेहमीप्रमाणे बाबा प्राणायाम करत बसले होते.

आई स्वयंपाक घरात उन्हाळी चटणीची तयारी करत होती.. त्यामुळे लाल मिरचीचा ठसका थोडाफार हवेत जाणवत होता.. तेच निमित्त साधून मी प्राणायाम करायला टाळलं..

माझी टाळाटाळ बघून स्वतः प्राणायाम करत बसलेले बाबा चिडले आणि माझा उद्धार सुरु झाला.. "तुम्हाला सगळं फुकट मिळालंय, परिस्थितीची जाण नाही, काही ऐकायला नको, फक्त निमित्त शोधत असता.... वगैरे... वगैरे... वगैरे ..."

मी सोफ्यावर शांत चित्ताने बसून शून्य नजतेने TV कडे बघत होतो. बाबा बोलत होते आणि मी तसाच शून्य नजरेने TV कडे बघत असताना तिथे सोफ्यावर असलेलं शांतिब्रह्म पुस्तक माझ्या नजरेस पडलं.. पुस्तक हातात घेतलं आणि सरळ शेवटचा धडा उघडला आणि वाचायला सुरुवात केली. वाचत असताना बाबांचे स्वर कानांवर पडत होते. पण ते शब्द कानात शिरू न देताच मी वाचत होतो..

वाचत असताना काही वेळाने बाबांचं बोलणं.. TV चा आवाज.. आईची स्वयंपाक घरातील खुडबुड, या सगळ्याचा आवाज माझ्या कानांवर पडेनासा झाला..


एकनाथांनी नाक धरून डोळे मिटले. "पांडुरंग हरी, वासुदेव हरी" म्हणून पाण्यात बुडी मारली व लगेच वर आले. सद्गुरुनाथऽ' अशी साद घालून दुसरी बुडी मारली. तिसरी बुडी मारताना "जय जनार्दन" अशी गर्जना केली व ते पाण्याखाली गेले. हा जणू त्यांचा 'देहअर्घ्य'च होता. कारण थोडा वेळ झाला तरी नाथ वर येईनात. लोकगंगेत खळबळ माजली. सर्वांची अंत:करणे भयभीत झाली. लोक ओरडू लागले. "नाथमहाराज बुडाले की काय? त्यांनी देह समर्पण केला की काय?" काहीजण तर अक्षरशः रडू लागले. काही हाका मारू लागले. किनाऱ्यावर एकच गडबड गोंधळ उडाला. सारा कोलाहल माजला. शातिब्रह्माच्या न दिसण्याने सारी अशांतता पसरली. एकनाथांनी बुडी मारली होती त्या ठिकाणी ती कृष्णकमळे हिंदोळत होती. आसमंत निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघाला होता. पण सौंदर्यातली भीषणता मात्र आमजनता अनुभवीत होती. त्यांच्या काळीज हेलावणाऱ्या आरोळ्या भीतीने काळजीग्रस्त झालेले चेहरे व अशुभ शंकेने शोकाकुल झालेली हृदये मनाचा ठाव घेत होती.

एकनाथ महाराज्यांनी गोदावरीत बुडी मारल्याचं वर्णन वाचताना मी सुद्धा गोदावरीच्या किनारी उभा राहून नाथांना हाक मारत असल्याचं वाटलं आणि एक दिव्य असा मंद सुगंध मला जाणवला. जसं की, एकनाथांनी बुडी मारलेल्या ठिकाणी उमललेल्या त्या कृष्णकमळांचाच तो दिव्य सुगंध असावा.

एकनाथ महाराज्यांनी गोदातरीत समाधी घेतल्याचं वर्णन वाचत असताना काही काळ तो दिव्य सुगंध माझ्या नाकात दरवळत होता..

हा अनुभव सांगण्यासाठी त्याच संध्याकाळी मी बाबांना फोन केला.. २० मार्चपासून lock-down मुळे कुर्ल्याला जाणं बंद झालं होतं, त्यामुळे तब्बल एका महिन्याने माझं बाबांशी बोलणं झालं होतं.. बाबांचे शब्द कानांवर पडताच अमृतवाणी ऐकल्यासारखं वाटलं.. साक्षात भगवंतांच्या मुखातून गीता ऐकताना अर्जुनाला जसं वाटलं असावं, तसंच काहीसं वाटत होतं... या अनुभवाबद्दल बाबांना सांगितलं असता बाबा म्हणाले, "हा अतिशय दिव्य अनुभव आहे.."

मी बाबांना विचारलं की, "बाबा हा असा अनुभव येण्यामागे काय कारण असावं?"

तर बाबा म्हणाले की, "तुला कारण जाणून घेऊन काय करायचंय ? असा अनुभव आला ही चांगली गोष्ट आहे..! त्यासाठी भगवंतांचे आभार मान .."


मी "हो बाबा" म्हणालो, आणि थोडं बोलणं झाल्यानंतर बाबांना नमस्कार करून फोन ठेवला..




...अपूर्ण

#SrSatish🎭

   

गुरुवार, ४ जुलै, २०१९

बक्षीस 🏆🏅

टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना लेखकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

गुरुवार, ३० जून, २०१६

पाऊस आणि मी..

सतिश शामराव रावण..


जय गुरुदेव, सद्गुरुंच्या चरणी नमन 🙏🏻🌹


गुरुवार दि. ३० जून २०१६

या वर्षी मान्सूनला वेळेत सुरूवात झाल्यामुळे २ - ४ दिवस पावसाच्या संततधारा कायम सुरू होत्या.

गुरुवारचा दिवस असल्यामुळे मला कुर्ल्याला जायचं होतं.. त्या दिवशी दिवसभर पाऊस थोडा मंदावला होता. पण रिपरिप पाऊस चालूच होता. माझा बाईक घेऊन कुर्ल्याला जाण्याचा बेत होता.. म्हणून दुपारी साडेचारच्या सुमारास पाऊस पूर्ण थांबला असताना मी निघालो.. घरातून निघताच मनातच भगवंतांना प्रार्थना केली की, "वरुण देवा आता अर्धा तास कृपा करा." असं म्हणून मी नामस्मरण करत कुर्ल्याच्या दिशेने निघालो.

संध्याकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी होतीच.. २५ - ३० मिनिटांचं अंतर सर करण्यासाठी पाऊण तास लागत होता. कलीना युनिव्हर्सिटी जवळ येताच अचानक पावसाच्या धारा बरसू लागल्या. मी पटकन बाईक रस्त्याच्या कडेला घेतली आणि एका दुकानाच्या शेड खाली उभा राहीलो.. कुतूहल म्हणून घड्याळात पाहीले तर, बरोबर ५ वाजून ३ मिनीटं झाली होती. ते पाहून माझ्या चेहऱ्यावर स्मित झळकले आणि मनात एक विचार येऊन गेला.. "भगवंतांनी आपल्या प्रार्थनेचा शब्दशः अर्थ घेतला वाटतं, आणि बरोबर अर्ध्या तासांनी पाऊस सुरू झाला.."

काही मिनिटात तो पाऊस सुद्धा थांबला आणि सव्वापाचच्या सुमारास मी कुर्ल्याला घरी पोहचलो...

याबद्दल बाबांना सांगितल्यावर बाबा हसले आणि म्हणाले, "मनापासून भगवंतांना हाक मारली की आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहचतो ."



या अनुभवावरुब असं जाणवलं की, हे संपूर्ण विश्व ज्या भगवंतांच्या पोटात सामावलं आहे त्याच विश्वव्यापी भगवंताच्या लेखी आपली छोटीशी का असेना, पण नोंद आहे.




...अपूर्ण


#SrSatish🎭